तलाठी व मंडल अधिकारी यांनी संगणमत करून सातबारावर वर्ती खोटे वारस  लावल्याने शेतकऱ्याचा तहसीलदार कार्यालयात अंगावरती रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न.

पालघर जिल्ह्यातील मौजे खोच–शिरसोनपाडा येथील वडिलोपार्जित जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर खोटी नावे नोंदविण्यात आल्याचा आरोप करत एका तरुण शेतकऱ्याने थेट नायब तहसीलदारांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज घडली. वेळीच कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला असून तालुक्यात खळबळ उडाली आहे. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार खोट्या दस्तावेजांच्या आधारे मंडळ अधिकारी व संबंधित तलाठी यांनी कोणतेही स्थानिक चौकशी न करता राजकीय दबावाखाली जमिनीचा सातबारा उताऱ्यावर नावे नोंदवली यामुळे माझ्यावर अन्याय झाल्याचे अर्जदाराने नमूद केले असून या अन्यायाविरोधात यापूर्वी मोखाडा पोलीस ठाणे तहसील कार्यालय मोखाडा उपविभागीय अधिकारी कार्यालय जव्हार येथे लेखी निवेदन दिली होती मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यास आरोप करत दहा दिवसात कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा पीडित शेतकऱ्याने दिला होता..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *