पालघर जिल्ह्यातील मौजे खोच–शिरसोनपाडा येथील वडिलोपार्जित जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर खोटी नावे नोंदविण्यात आल्याचा आरोप करत एका तरुण शेतकऱ्याने थेट नायब तहसीलदारांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज घडली. वेळीच कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला असून तालुक्यात खळबळ उडाली आहे. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार खोट्या दस्तावेजांच्या आधारे मंडळ अधिकारी व संबंधित तलाठी यांनी कोणतेही स्थानिक चौकशी न करता राजकीय दबावाखाली जमिनीचा सातबारा उताऱ्यावर नावे नोंदवली यामुळे माझ्यावर अन्याय झाल्याचे अर्जदाराने नमूद केले असून या अन्यायाविरोधात यापूर्वी मोखाडा पोलीस ठाणे तहसील कार्यालय मोखाडा उपविभागीय अधिकारी कार्यालय जव्हार येथे लेखी निवेदन दिली होती मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यास आरोप करत दहा दिवसात कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा पीडित शेतकऱ्याने दिला होता..
पालघर : जिल्ह्यातील विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा आणि…
पालघर जिल्ह्यात युवासेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी एका वादग्रस्त व्यक्तीची नियुक्ती करण्यात आल्याने संघटनेत नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. या नियुक्तीमुळे…